Last Update: 9 Hrs ago
आणि घरातच शाळा भरली
शाळेत जाण्याचा कंटाळा हा मुलांसाठी नवा नाही. नियमितपणे शाळा बुडवणाऱ्यांची संख्याही कमी नाही. पण अशा मुलांना पुन्हा वर्गात बसवण्यासाठी शाळाच त्यांच्या अंगणात भरू लागली तर? अकोल्यातील संगलूड गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेने हा प्रयोग राबवला आणि त्याचा चांगला परिणामही दिसून आला.
विशेष लेखः
भारत १९५० साली प्रजासत्ताक राष्ट्र झाले. त्यानंतरच्या काळात आपण नियोजनबद्ध विकासाचा मार्ग अनुसरला. अकरा पंचवाषिर्क योजना आपण पूर्ण केल्या.
राजपथावर महिलांनी केले वायुदलाचे नेतृत्व
भारताच्या ६३व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथवर झालेल्या संचलनामध्ये (परेड) फ्लाइट लेफ्टनंट स्नेहा शेखावत या महिलेने वायुसेनेच्या पथकाचे नेतृत्व केले. राजपथवरील संचलनाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
पुण्यात एसटी ड्रायव्हर बनला सैतान, ८ जण ठार
पुण्यात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास एसटीचा बस चालक संतोष मारुती माने (३०) याने सातारा-पुणे-सातारा एसटी बस ताब्यात घेतली आणि पुढचे दीड तास शहरातील रस्त्यांवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या घटनेत आतापर्यंत आठ जण ठार आणि २७ जण जखमी झाले आहेत.
'राज ठाकरेंनी दिली गुन्हेगारांसारखी वागणूक'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बंडखोरीने डोकेही वर काढू नये याकरिता अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या इच्छुक उमेदवारांना गुन्हेगारांसारखी वागणूक देण्यास सुरुवात केली असून त्यामुळे इच्छुकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
'अग्निपथ'चा मराठी पथदर्शक
एका सामान्य मराठी माणसाच्या संषर्घाची कहाणी सांगणाऱ्या बहुचचिर्त 'अग्निपथ' सिनेमात अजय- अतुल या मराठी संगीतकार जोडीने 'चिकनी चमेली' गाण्याने हिंदी सिनेसृष्टीत धमाल उडवली असतानाच, या सिनेमाच्या मेकिंगमध्ये आणखी एका मराठी माणसाचे मोलाचे योगदान असल्याचे समोर आले आहे.
मुलांची करणी आणि शाळेत पाणी
पिंपरी खेदी... बुलडाण्याच्या नांदुरा तालुक्यातील दुर्गम गाव. पक्की वाट नाही, वीज नाही, पाणी नाही... खेडोपाडी जी काही स्थिती असेल त्याला साजेसे असेच हे गाव.
प्रजासत्ताक दिनी इंफाळमध्ये बॉम्बस्फोट
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर कडेकोट बंदोबस्त असूनही दहशतवाद्यांनी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे बॉम्बस्फोट केला. शामाशाखी शाळेजवळ सकाळी नऊच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला.
राजपथवर वायुदलाची महिलाशक्ति
भारताच्या ६३व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथवर झालेल्या संचलनामध्ये (परेड) फ्लाइट लेफ्टनंट स्नेहा शेखावत या महिलेने वायुसेनेच्या पथकाचे नेतृत्व केले. राजपथवरील संचलनाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
नौदलाची गुप्त माहिती FB वर!
भारतीय नौदलाची गोपनीय माहिती फेसबुकवरुन जगजाहीर झाली आहे. या प्रकरणी नौदलाच्या मुंबई तळावर कार्यरत असलेल्या चार वरिष्ठ अधिका-यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. दोषी अधिका-यांवर लवकरच कारवाई होणार आहे.
नॉर्वेतील पेच सुटला; मुले काकाकडे
'मानसिकदृष्ट्या विलग' झाल्याच्या आरोपावरून नॉर्वेतील बालसुरक्षा सेवेने ताब्यात घेतलेली भट्टाचार्य दाम्पत्याची दोन्ही मुले अखेर त्यांच्या काकांकडे देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने पुढाकार घेतल्यामुळे अखेर हा तिढा सुटला.
केंद्रीय अर्थसंकल्प मार्चच्या मध्यात
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेला केंदीय अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या मध्यात सादर होईल, असे संकेत केंदीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी दिले.
भाडेवाढ नाही तर अधिभार
तोट्याच्या रूळांवरून धावणाऱ्या भारतीय रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या उपाययोजनांवर चर्चेच्या फैरी दिल्लीत सुरू आहेत. एकीकडे रेल्वेमंत्री प्रवासी भाडे वाढवण्यासाठी आग्रही आहेत, तर त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचा याला विरोध आहे.
उद्योजकांसाठी बँकिंग परिषद
लघुउद्योजकांना वेळेत व प्राधान्याने कर्जपुरवठा व्हावा म्हणून एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र औद्योगिक व आथिर्क विकास असोसिएशन यांनी ४ फेब्रुवारी रोजी 'एसएमई बँकिंग परिषदे'चे आयोजन केले आहे.
करमुक्त बाँडची विक्री
३१ मार्च जवळ आल्यानंतर अनेकांची कर नियोजनासाठी घाई सुरू होते. उत्पन्न, गुंतवणूक, बसणारा कर याची आकडेमोड करून कर वाचवण्यासाठी चांगल्या पर्यायांचा शोध सुरू होतो.
पेस सुसाऽऽऽट
लिअँडर पेसने आस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीत उपांत्य तर मिश्रमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सौरभ राष्ट्रीय विजेता
बंगळुरु: सौरभ वर्मा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेता ठरला. मध्य प्रदेशच्या या २० वर्षीय खेळाडूने अंतिम फेरीत बी. साईप्रणीथवर २१-१९, २१-१९ असा विजय मिळवून जेतेपदावर नाव कोरले.
तणावाचा उद्रेक
पुण्यामध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या विचित्र अपघाताने सगळ्यांनाच अस्वस्थ केले आहे. खरे तर हा अपघात हा घडलेला नाही, तर घडविलेला आहे.
चक्र आणि अरिहंत
नौदलामध्ये विमानवाहू युद्धनौकेचे जेवढे सामरिक महत्त्व असते, तेवढेच महत्त्व पाणबुडीलाही असते. १९७१च्या युद्धात पाणबुड्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. पण गेल्या काही वर्षांत भारतीय नौदलाची ही पाणबुड्यांची बाजू त्यांच्या रोडावलेल्या संख्येमुळे तोकडी पडत चालली होती.
प्रजासत्ताकापुढची आव्हाने
भारत १९५० साली प्रजासत्ताक राष्ट्र झाले. त्यानंतरच्या काळात आपण नियोजनबद्ध विकासाचा मार्ग अनुसरला. अकरा पंचवाषिर्क योजना आपण पूर्ण केल्या.
साथ आणि संगत
वैद्यकीय संशोधन आणि सुविधांमुळे सरासरी वयोमान वाढल्याचे सामाजिक परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत.
जुबान पे लगाम दो
दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांना २०११ साल बकवास गेल्यानं आपल्या कार्यालयात वास्तुशास्त्राच्या अभ्यासकाला बोलावून फेरबदल करण्याची त्यांची कल्पना हास्यास्पद आहे.
आघाडीला मत देऊन भ्रष्टाचारी बनू नका
सोनिया गांधी काही मिनिटे भेट देऊन पुन्हा दिल्लीत परततात, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याऐवजी शरद पवार क्रिकेटपटूंसोबत फोटो काढण्यात धन्यता मानतात, अशा लोकांच्या हातात मुंबई सोपवू नका, असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले.
परीक्षा नियंत्रक विलास शिंदे निलंबित
चुकीच्या नियुक्तीवरून वादात अडकलेले मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास शिंदे यांना अखेर बुधवारी निलंबित करण्यात आले.
राजनी दिली गुन्हेगारांसारखी वागणूक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बंडखोरीने डोकेही वर काढू नये याकरिता अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या इच्छुक उमेदवारांना गुन्हेगारांसारखी वागणूक देण्यास सुरुवात केली असून त्यामुळे इच्छुकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
...आणि घरातच शाळा भरली!
कुणीतरी येईल आणि आहे ती परिस्थिती बदलेल, असा विचार न करता 'आपला आपण करावा उद्धार'चा उत्तम आदर्श घालून दिला आहे महाराष्ट्रातल्या दोन खेड्यांतील शाळांनी. प्रजासत्ताकाचा अनुभव देणारी ही दोन उदाहरणे...
तिवरांच्या रक्षणासाठी रॅली
तिवरांची मोठ्या प्रमाणात होणारी कत्तल, मोकळ्या जागांवर होणारे अतिक्रमण आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी 'लोखंडवाला ओशिवरा सिटीझन असोसिएशन'ने गुरुवारी प्रजासत्ताक दिनी विशेष रॅलीचे आयोजन केले आहे.
शोभा गुर्टू यांना उद्या संगीतमय आदरांजली
उस्ताद झाकीर हुसेन, त्रिलोक गुर्टू, निलादीकुमार, शेल्डॉन डिसिल्व्हा, शुभा जोशी आणि अनिश प्रधान आदी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर 'म्हारो प्रणाम' या शोभा गुर्टू यांना श्रद्धांजली कार्यक्रमात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
शाही विवाह समारंभाची तयारी
विरार-चंदनसार रोडजवळील सुमारे अडीचशे एकर मैदानात रविवार, २९ जानेवारी रोजी सामुदायिक विवाह होणार आहे.
सेझच्या जमिनी परत करा
उरण तालुक्यातील २१ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी महामुंबई सेझसाठी संपादित करण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पार पाडावी, अन्यथा जमिनी परत कराव्यात, अशी मागणी करणारी याचिका खोपटे येथील चंद्रकांत घरत यांनी पनवेल न्यायालयात दाखल केली आहे.
साईदर्शन घ्या; मलाच मत द्या!
जवळपास फुकटात साईबाबांचे दर्शन घडत असले, तरी साईचरणी माथा टेकताना आगामी निवडणुकीत या बुकीच्याच पारड्यात मत टाकू, अशी शपथ भक्तगणांना घ्यावी लागल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
कारच्या धडकेने मजूर ठार
भरधाव सेंट्रो कारच्या धडकेत रंगकाम करणारा एक व्यक्ती ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाशी सेक्टर-१४ मध्ये घडली याप्रकरणी वाशी पोलिसांनी इशिका निगोजकर (१८) या सेंट्रो कारचालक असलेल्या तरुणीला अटक केली आहे.
जेएनपीटीजवळ चौथे बंदर उभारण्यात येणार
जेएनपीटी बंदर देशातील आयात-निर्यातीच्या एकूण ६० टक्केपेक्षा अधिक व्यापार करीत आहे. जेएनपीटी बंदराचा विस्तार झाल्यानंतर येथे जेएनपीटीसह तीन बंदरांची निर्मिती झाली. या बंदरातून गेल्या वर्षी ४० लाख २७ हजार कंटेनरची विक्रमी हाताळणी करण्यात आली.
कॅलिग्राफीचे आज प्रदर्शन
अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी आणि ऊर्जा द कॅलिग्राफिक मुव्हमेंट, नवी मुंबईच्या वतीने मास्टर स्ट्रोक हे कॅलिग्राफीचे प्रदर्शन वाशीच्या अच्युत पालव स्कूल ऑप कॅलिग्राफीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
पुण्यात एसटी ड्रायव्हर बनला सैतान!
माथेफिरू एसटी ड्रायव्हरने स्वारगेट बस स्थानकामध्ये उभी असलेली बस पळवून बुधवारी सकाळी शहरभर बेधुंद संचार केला. दुचाकी, रिक्षा, मोटारींसह सुमारे तीस गाड्यांचा चुराडा करीत वीस किलोमीटरहून अधिक परिसरात त्याने मृत्यूचे तांडव करीत आठ निष्पापांचा जीव घेतला.
धक्का... आक्रोश... संताप अन् हळहळ...!
सकाळची वेळ... चालकाने पळविलेल्या एसटीच्या धडकेने एकेका चौकात झालेले अपघात... अपघातातील जखमींसह हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जात होते...
गुन्हेगार, नातेवाइकांना 'नो तिकीट'
नेत्यांचे कुटुंबीय आणि नातेवाइकांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली असून महापालिका निवडणुकीत त्याचे तंतोतंत पालन केले जाईल, असे भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी बुधवारी स्पष्ट केले.
आयटी कंपन्यांनो, एकत्र या
देशातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी सर्व कंपन्यांनी एकत्र येऊन सामायिक व्यासपीठावर ज्ञानाची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे, असे मत 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले.
बोलीभाषा झाली शिक्षणाची भाषा
एखाद्या शाळेत असे शब्द ऐकायला मिळाले की, आजवर मराठीचे मास्तर पोराला 'बावकाट' धरून बाहेर काढत असत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बहिरवाडी या आदिवासी बहुल खेडेगावातील शाळेत आता मास्तरच पोरांशी या भाषेत बोलत होते.
विद्यार्थ्याने लावला 'मृत्यूला' बेक
बेफामपणे गाडी चालवत असलेला ड्रायव्हर, साक्षात् मृत्यू बनलेली एसटी, गाडीच्या मागेपुढे सैरावैरा पळणारे लोक आणि रक्तबंबाळ जीव... असे थैमान माजवत निघालेल्या संतोष मानेला अखेर एका विद्यार्थ्याने 'बेक' लावला.
व्हॉट इज धिस 'प्रजासत्ताक'?
ज्या दिवशी आपली घटना लागू झाली, भारत गणराज्य झाले, त्या दिवसाविषयी बहुसंख्य नाशिककर अनभिज्ञच असावेत, अशी शंका घेण्याइतपत धक्कादायक निष्कर्ष 'टीम मटा'ने केलेल्या सर्वेक्षणातून हाती आले.
सर्वच पक्षांना बंडखोरांची भीती
महानगरपालिका निवडणुकीसाठी बंडखोरी होऊ नये, म्हणून पक्षांनी उमेदवारांची घोषणा लांबवली असली, तरी प्रत्यक्षात सर्वच पक्षांत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते विशेष लक्ष्य ठेवून असल्याचे समजते.
निवडणुकीतील पहिला गुन्हा दाखल
जिल्हा परिषदेच्या निवडणूक काळातील जिल्ह्यातील पहिला गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उगाबाई लहू झोले यांनी यासंबंधीची तक्रार दिली होती.
जिल्हा प्रशासन ओळखच विसरले
राष्ट्रीय मतदार दिनाच्या समारंभात व्यासपीठावर आलेल्या महिलेला दुसऱ्याच महिलेचे मतदान ओळखपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचे पुन्हा एकदा प्रदर्शन झाले आहे.
पिंपळगाव बसवंत होणार अॅग्री हब
आशियाई बँकेने दिलेल्या अर्थसहाय्यातून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे अॅग्रीकल्चर हब स्थापन करण्यात येणार आहे. शिवाय नाशिक, अहमदनगर आणि जळगाव या तीन जिल्ह्यांत एकूण ८ ठिकाणी स्पोक मॉडेल्स उभारण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या ११४५ उमेदवारी अर्जांची खरेदी
महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी दिवसभरात ५५७ इच्छुकांनी तब्बल ११४५ अर्जांची खरेदी केली. त्यातील २५ जणांनी अर्जही भरले. दरम्यान, प्रजासत्ताक दिनामुळे २६ जानेवारीला अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया बंद राहणार आहे.
शिर्डी संस्थानात नवी कमिटी केव्हा?
श्री साई शिर्डी संस्थान मॅनेजमेंट कमिटीचा कार्यकाल संपून साडेचार वर्षांचा कालावधी संपूनही नवीन कमिटी स्थापन न केल्याने राज्य शासनाने शपथपत्र दाखल करावे, असे निदेर्श मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. भूषण गर्व व न्या. एम. टी. जोशी यांनी दिले आहेत.
'अण्णांचा तिरंगा' झाला २५ वर्षांचा
पंचवीस वर्षांपूर्वीचा प्रजासत्ताक दिन. अण्णांनी छातीवर तिरंगा लावला. त्यांच्या तिरंग्याकडं लोक आश्चर्यानं बघायचे. कुणी त्याबद्दल विचारायचे. अण्णा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. कुणी तिरंगा मागायचे. अण्णा तोही द्यायचे...या साऱ्याला आता बघता बघता पाव शतक झालं.
नांदेडमध्ये सर्वच पक्षात घराणेशाही
देशात व राज्यात बहुतेक पक्षात घरणेशाहीचा वरचष्मा असताना नांदेड जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणुकातही बहुतेक पक्षात नातेवाईक व सगेसोयरे यांना उमेदवारी देण्याचे प्रकार घडले आहेत.
जवानांचे गाव सुविधांपासून कोसो दूर
डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या जवांनाचे गाव असलेल्या सिसारखेड्यात कोणत्याच सुविधा पोहोचल्या नाहीत. सुट्टी घेऊन आलेल्या सैनिकांना चक्क बैलगाडीत सामान लादून गाव गाठावे लागते. हे गाव सिल्लोडपासून फक्त १७ किलोमिटर अंतरावर आहे.
सफाई मजुरांच्या पगारामध्ये 'डबलगेम'
सफाई मजुरांचे पेमेंट काढण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 'डबलगेम' केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. एका मजूराला आजारी दाखवून त्याच्या जागी कंत्राटी पद्धतीवर दूसऱ्या मजूराची नियुक्ती करून, या दोन्हीही मजुरांचे पेमेंट काढण्याचा प्रकार महापालिकेच्या काही विभागीय कार्यालयांमध्ये घडला आहे. दोन मजूरांना एकाच कामाचे पेमेंट देण्यात आल्यामुळे यात 'अर्थपूर्ण' व्यवहार झाल्याचीही चर्चा आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी 'वेटिंग'वर
राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी 'फायनल' झाली असली, तरी वरिष्ठ्यांचा 'ग्रीन सिग्नल' न मिळाल्याने यादी 'वेटिंग'वर पडली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची स्थिती चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखीच आहे. योग्य उमेदवाराला 'प्रचाराला लाग' असा मंत्र दिला जात आहे.
अॅडलेडमध्येही भारताचे रडगाणे
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अॅडलेडमध्ये सुरू असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीतही भारताचा प्रवास मोठ्या पराभवाच्या दिशेने सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या ६०४ धावांना उत्तर देताना भारताची २७२ धावांत दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने पुन्हा मैदानात उतरुन धावांची आघाडी आणखी वाढवली.
मिसबाने पाकला सावरले
माँटी पानीसरच्या फिरकीवर पाकचा कर्णधार मिसबा उल हकला अँडरसनने ३० धावांवर दिलेले जीवदान इंग्लंडला महागात पडण्याची चिन्हे दिसताहेत. दुसऱ्या कसोटीत पाकने पहिल्या दिवसअखेरीस ७ बाद २५६ अशी मजल मारली.
ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर
मायकल क्लार्क, रिकी पाँटिंग या आजी माजी कर्णधारांनी ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीपची उमेद देताना आपली द्विशतके झळकावून तर घेतलीच पण अॅडलेड ओव्हलवरील सवोर्च्च भागीदारीचा विक्रम नोंदवला.
युवराजसिंग IPL-5 ला मुकणार
सध्या अनफिट असलेला युवराजसिंग आगामी आयपीएलच्या पाचव्या मोसमाला मुकणार आहे. युवराजला फुफ्फुसाच्या तक्रारी जाणवत असून यामुळे जवळपास सहा महिने तो क्रिकेटपासूनच दूर राहण्याची शक्यताही वर्तवली जातेय.
झकास
लग्न
|
Last Update: 3 Hrs ago
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो (फोटो फीचर)
राजधानी नवी दिल्लीतील राजपथ आज (गुरुवार) विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांनी गजबजून गेला होता. यंदाच्या ६३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्या यिंगलुक शिनावात्रा यांच्यासह तीन्ही दलांचे प्रमुख, विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते हा प्रसंग डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमध्ये घूसखोरी रोखताना हौतात्म्य आलेल्या लेफ्टनंट नवदीपसिंग यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. नवदीपसिंगचे वडील सुभेदार मेजर (निवृत्त) जोगिंदरसिंग यांनी स्वीकारले. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्या थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांचे स्वागत करताना राष्ट्रपती प्रतिभा पाटील पंतप्रधान शिनावात्रा यांची संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, संरक्षण राज्यमंत्री डॉ. एम. एम. पल्लम राजू, लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांची ओळख करून देताना राष्ट्रपती प्रतिभा पाटील प्रमुख पाहुण्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मुख्य सलामी मंचाकडे नेताना इंडिया गेट येथील शहीद जवानांच्या अमर जवान ज्योतीला पंतप्रधान डॉ.
प्रजासत्ताक दिनी लष्करी सामर्थ्यांचे प्रदर्शन
नवी दिल्ली - देशाचे लष्करी सामर्थ्य आणि प्रगल्भ सांस्कृतिक वारशाचे आज (गुरुवार) नवी दिल्लीमध्ये ६३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य प्रदर्शन करण्यात आले. राजधानीतील राजपथावरील मुख्य संचलनासाठी थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान यिनलुक शिनावात्रा, या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे अज्ञात शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर संचलनाला प्रारंभ झाला. आज सकाळी थंडीला न जुमानता आठ किलोमीटर लांबीच्या राजपथ या संचलन मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुरवातीला विविध राज्यांतील सांस्कृतिक चित्ररथांचे संचलन झाले. त्यापाठोपाठ जनरल ऑफिसर कमांडिंग (दिल्ली) ले. जनरल व्ही. के. पिल्लई यांच्या नेतृत्त्वाखाली लष्कर आणि पोलिसांची लष्करी आणि पोलिस बँडच्या तालावर संचलने झाली. सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांची मानवंदना स्वीकारली. या प्रसंगी राष्ट्रपतींशिवाय प्रमुख पाहुण्या यिंगलुक शिनावात्रा, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, संरक्षणमंत्री ए. के.
गजर एकता, अंहिसा आणि संस्कृतीचा
आचारसंहितेच्या बडग्यात गोव्यात साजरा प्रजासत्ताकदिन पणजी - देशाची एकता, अंहिसा, संस्कृतीचा गजर आणि स्वातंत्र्यसैनिकांचे गुणगान करणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे भाषण, त्याला मिळालेली गोमंतकीय व भारतीय संस्कृतीपर नृत्यनाट्यांची जोड, हे गोव्यातील 63 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आजचे (गुरुवार) वैशिष्ट्य होते. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेच्या बडग्यातला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम तासाभरात आटोपला. देशात राष्ट्रपती व राज्यात राज्यपाल भारताच्या गणतंत्रदिनी 26 जानेवारी रोजी दरवर्षी ध्वजवंदन करतात. परंतु यंदा महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा आहे. शंकरनारायणन यांना महाराष्ट्रातही ध्वजवंदन करायचे होते व त्यामुळे गोव्यातील झेंडावंदनाची जबाबदारी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री कामत यांच्यावर सोपविली. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे आणि कामत हे कॉंग्रेसचे एक इच्छुक उमेदवार असल्यामुळे, त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यास सरकारने निवडणूक आयोगाकडे परवानगी घेतली होती.
धुळ्यात मनसेच्या "शाई'पासून राज्यमंत्री बचावले
धुळे - प्रजासत्ताक दिनानिमित्त आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज ध्वजवंदन होते. तत्पूर्वी, ते बुधवारी सायंकाळी मुक्कामी आले. त्यांनी येथील साक्री रोडवरील गुलमोहर विश्रामगृहात तळ ठोकला. त्यावेळी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राम सोमवंशी आदी उपस्थित होते. त्यांच्यातील चर्चेवेळी रात्री साडेदहाला "मनसे'च्या माजी जिल्हाप्रमुख प्राची कुळकर्णी, मिलिंद जोशी, नितीन रोकडे व अन्य एका महिला सहकाऱ्याने मंत्री गावित यांना "बीपीएल' सर्वेक्षणासंदर्भात निवेदन देण्यासह चर्चा करायची आहे, अशी गळ घातली. परवानगीनंतर "मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गावित यांच्यापुढे मागण्या मांडल्या. चर्चेवेळी श्रीमती कुळकर्णी यांच्या पर्समधून "शाई' गळत असल्याचे मंत्री गावित यांना लक्षात आले. त्यांनी ते निदर्शनास आणून दिले. पोलिस निरीक्षक सोमवंशी व सहकाऱ्यांनी तत्काळ श्रीमती कुळकर्णी व सहकाऱ्यांना मागे हटकले.
धुळ्यात आत्मदहन करणारे 13 अटकेत
धुळे - प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत असताना, धुळे शहरात विविध कारणांवरून आत्मदहन करणाऱ्या 13 जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे. न्यायासाठी दोंडाईचा येथील उपोषणकर्त्या चार व्यावसायिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सकाळी अकराला, तर खलाणे (ता. शिंदखेडा) येथील दोन भावांमधील कौटुंबिक वाद प्रकरणी नऊ जणांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशव्दारात दुपारी बाराला अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सतर्क पोलिसांनी हे प्रयत्न अयशस्वी ठरवले. दोंडाईचा पालिका क्षेत्रात आठवड्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन कारवाई राबविण्यात आली. तेथील धुळे- नंदुरबार रस्त्यावरील व्यंकटेश मार्केटची 78 दुकाने हटविण्यात आली. तथापि, ही दुकाने 1987 मध्ये शासनाच्या आदेशानुसार "सिटी सर्व्हे'तील नोंदीत समाविष्ट झाली. यामुळे मालमत्ता पत्रक व सातबारा मिळाला. याआधारे ही दुकाने हटवू नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली.
नकी, नदीमच्या चौकशीसाठी पोलिस पथके मुंबईत
मुंबई - झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर कबुतरखाना येथील 13/7च्या बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसने (राज्य पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक) अटक केलेल्या नकी अहमद शेख आणि नदीम शेख यांच्या चौकशीसाठी अन्य राज्यांतील पोलिस पथके मुंबईत दाखल होऊ लागली आहेत. या पोलिस पथकांतील अधिकारी त्यांच्या राज्यांतील बॉम्बस्फोटांबाबत या आरोपींकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे एटीएसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील 13/7 च्या तिहेरी बॉम्बस्फोटांची एटीएसने उकल केली. त्यानंतर इंडियन मुजाहिदीनने अन्य राज्यांत घडवलेले बॉम्बस्फोट तसेच त्या राज्यांत पसरवलेल्या "स्लीपर सेल' जाळ्याबाबत परराज्यांतील पोलिस पथकांकडून माहिती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकळ ऊर्फ इम्रानला नकी शेख 2008 पासून ओळखत असल्याने त्याच्याबाबतची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्नही या पथकांकडून केला जात आहे. मुंबईत स्फोट घडवण्यासाठी दुचाकी वाहने चोरताना नकी आणि नदीम यांनी आणखी दोन युनिकॉर्न मोटरसायकली चोरल्या. या मोटरसायकली त्यांनी रेल्वेगाडीतील "ब्रेकव्हॅन'मधून दरभंगा येथील मूळ गावी पाठवल्या.
विरोधकांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगू
मुंबई - मुंबईत आम्ही काम करून दाखवले आहे. पण विरोधक काही ठिकाणी कचरा टाकून छायाचित्र प्रसिद्ध करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज केला. आता भगव्या आणि निळ्या झेंड्याखाली मर्द मावळा एकटवला आहे त्याला डिवचू नका. वेडेवाकडे आरोप केलेत तर तुमच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगू, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. मुंबई कोणत्याही स्थितीत कृपाशंकर सिंह यांच्या हातात जाऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज उद्वव ठाकरे यांच्या हस्ते फोडण्यात आला. विक्रोळी येथे झालेल्या या सभेला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह मनोहर जोशी, रामदास कदम, विनोद तावडे, संजय राऊत, राज पुरोहित, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आता बोलके पोपट उडू लागतील, कॉंग्रेसची पितरे दिल्लीतून मुंबईत उतरतील असे टोले उद्धव ठाकरे यांनी लगावले. कोणत्याही स्थितीत येथील मराठी माणूस मुंबई कृपाशंकर सिंहच्या हाती जाऊ देणार नाही.
एसटी देणार नुकसानभरपाई
मुंबई - पुण्यात एका एसटी बसचालकाने बस पळवून नऊ जणांचा बळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात चालकांच्या मानसिक-शारीरिक तपासणीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. ती बस पळवून नेणारा संतोष माने हा मनोरुग्ण असल्याची चर्चा सुरू असली, तरी एसटीकडे तशी नोंद नाही, असा दावा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी केला आहे. त्या घटनेतील 9 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख आणि 29 जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या जखमींचा वैद्यकीय खर्चही एसटी महामंडळच करणार आहे. स्वारगेट येथील त्या प्रकारानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या कपूर यांनी संबंधित चालक आणि त्याच्या आदल्या दिवशीच्या (ता. 24) सहकारी वाहकाकडून माहिती घेतली. मात्र 24 जानेवारीच्या सायंकाळी 7.30 वाजता गाणगापूर येथून एसटी बस घेऊन आलेल्या माने याच्या वर्तनात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, असे त्याच्या सहकारी वाहकाने सांगितले.
बनावट सिमकार्डनंतर आता चोरीचे मोबाईल
मुंबई - मुंबईतील 13/7 च्या तिहेरी बॉम्बस्फोटांचा छडा बनावट सिमकार्ड रॅकेटच्या साह्याने लावल्यानंतर आता इंडियन मुजाहिद्दीनचे नवे दरभंगा मॉड्यूलचे सदस्य चोरीचे मोबाईल वापरत असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. बॉम्बस्फोटांप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या नदीमच्या चौकशीत हे मोबाईल बिहार, मुंबई व पुण्यातून चोरण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. बनावट सिमकार्डच्या गुन्ह्यातील आरोपी नकी शेख व नदीम शेख यांचा सहभाग मुंबई स्फोटात पुढे आल्यानंतर आता त्यांनी काही मोबाईलही चोरी केले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. नदीमच्या चौकशीत त्यांनी मुंबई, पुणे आणि बिहारमधून सुमारे 13 मोबाईल चोरल्याचे पुढे आले आहे. एटीएसच्या तपासात यापूर्वी झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस येथील स्फोटांमध्ये वापरण्यात आलेल्या मोटरसायकलीही नदीम व नकी यांनी हरकिशनदास रुग्णालय व व्ही. पी. रोड येथून चोरल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएस यासीन भटकळसह वकास व तबरेज या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. त्यांच्याकडील पॅनकार्डही बनावट कागदपत्रांच्या साह्याने पाटण्यातून बनविल्याचे पुढे आले आहे.
महाराष्ट्रातील 43 जणांना राष्ट्रपती पोलिस पदके
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल तर 40 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींची पोलिस पदके जाहीर झाली आहेत. दर वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कामगिरी बजावणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींच्या पोलिस पदकाने सन्मानित करण्यात येते. या पदकप्राप्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी आज सायंकाळी केंद्रीय गृह विभागाने जाहीर केली. महाराष्ट्र पोलिसांच्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कौशलकुमार पाठक, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अतिरिक्त पोलिस महासंचालक अशोक धिवरे, गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक सुनील रामानंद, लाचलुचपतविरोधी पथकाचे उपमहानिरीक्षक निकेत कौशिक व कालिना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस उपायुक्त हरविंदर वराईच यांचा पदकविजेत्यांमध्ये समावेश आहे. यापूर्वी पाठक यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून तर धिवरे यांनी तुरुंग विभागाचे महानिरीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
'फेसबुक', 'ट्विटर'वरील माहितीवर नियंत्रण अशक्य
मुंबई - फेसबुक, यू ट्युब, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटस्वरील वैयक्तिक अकाऊंटवर अपलोड होणाऱ्या माहितीवर नियंत्रण ठेवणे अशक्य बाब असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नीला सत्यनारायण यांनी आज दिले. त्याच वेळी अशा प्रकारच्या डिजिटल माध्यमांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करण्यासंदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत आयोगाशी संपर्क साधलेला नाही. या साईटस्वर प्रचारासंदर्भात मजकूर माहिती अपलोड करण्यापूर्वी राजकीय पक्षांनी आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असेही त्या या वेळी म्हणाल्या. सध्या सोशल नेटवर्किंग साईटस् वापरणाऱ्यांची संख्या देशात कोट्यवधींच्या घरात आहे. केवळ मुंबईतच "फेसबुक'चा वापर करणाऱ्यांची संख्या 43 लाखांच्या घरात आहे. "यू ट्युब' व "ट्विटर'चा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे प्रचारासाठी डिजिटल मीडियाचा वापर करण्याकडे राजकीय पक्षांचा ओढा आहे. अनेक राजकीय पक्षांनी "फेसबुक'सारख्या सोशल नेटवर्किंग साईटस्वर स्वतःची पेजेस तयार केली आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी या पक्षांनी ब्लॉगचाही वापर करणे सुरू केले आहे.
पुण्यातील कृत्य; अपमान वा नैराश्यातून
ठाणे - स्वारगेट येथे घडलेल्या घटनेतील एसटी चालक संतोष माने याचे कृत्य हे अन्याय्य परिस्थितीच्या विरोधातील वा त्यातून आलेल्या नैराश्यातून घडले असावे. एसटी महामंडळ माने हा मनोरुग्ण नव्हता, असे सांगत आहे. मात्र मानसिक चाचणी होते त्याक्षणी तो माणूस निरोगी असतो, पण जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा सभोवतालची परिस्थितीही आणि व्यक्तीची सद्य मानसिक स्थिती तितकीच महत्त्वाची असते. माने याचे कृत्य हे थंड रक्ताचे (कोल्ड ब्लडेड) कृत्य असल्याचे मत येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय कुमावत यांनी व्यक्त केले. माने याचे हे कृत्य ही खूप सामान्य गोष्ट असल्याचे मतही त्यांनी नोंदविले. यामागचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, 'नार्वे किंवा अमेरिकेत पौंगडावस्थेतील मुले किंवा पुरुषांकडून अशा घटना घडलेल्या आहेत. या बहुतेक घटना या नैराश्यातून किंवा मला समाजव्यवस्थेचा बदला घ्यावयाचा आहे, या भावनेतून घडतात, त्यात माणूस हा "टार्गेट' केला जातो,'' अशी मीमांसा त्यांनी केली. परदेशात शस्त्रास्त्रे सहज उपलब्ध होत असल्याने तिथे अशा घटनांमध्ये त्याचा वापर होतो, माने याने वाहनाचा वापर केला.
|
|